“सुरक्षेच्या कारणांचा आधार घेत विशिष्ट समाजाला लक्ष्य केल्याचा संशय” — डॉ. फरहा शेख यांचे निवेदन
बोपोडी | प्रतिनिधी : दी. 27 मे 2026
बकरी ईदनंतर पारंपरिक पद्धतीने साजऱ्या केल्या जाणाऱ्या “बासी ईद” निमित्त अनेक मुस्लिम कुटुंबे शहरातील बागा, उद्याने व पर्यटनस्थळांना भेट देत असतात. या पार्श्वभूमीवर पुण्यातील सारसबाग २८ व २९ मे २०२६ रोजी बंद ठेवण्याच्या निर्णयावर मिस फरहा चॅरिटेबल फाउंडेशनने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉ. फरहा अनवर हुसेन शेख तसेच सामाजिक कार्यकर्ते अनवर हुसेन शेख यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सारसबाग बंद ठेवण्यामागील कारणे प्रशासनाने स्पष्ट करावीत. सुरक्षेच्या कारणास्तव निर्णय घेतला असल्यास, त्याच कालावधीत शहरातील इतर बागांबाबत वेगळी भूमिका का घेतली जात आहे, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे.
निवेदनानुसार, “बासी ईद” निमित्त सारसबागेला भेट देण्याची परंपरा अनेक वर्षांपासून सुरू असून, सार्वजनिक ठिकाणे सर्व नागरिकांसाठी समान हक्काने खुली असली पाहिजेत. सुरक्षेच्या कारणास्तव काही अडचणी असल्यास प्रशासनाने पोलीस बंदोबस्त व अतिरिक्त सुरक्षा व्यवस्था वाढवावी; मात्र विशिष्ट समाजाच्या पारंपरिक कौटुंबिक भेटींवर अप्रत्यक्ष निर्बंध येतील असे निर्णय टाळावेत, अशी मागणी फाउंडेशनने केली आहे.
फाउंडेशनच्या वतीने पुणे महानगरपालिका प्रशासन, उद्यान विभाग तसेच संबंधित अधिकाऱ्यांना लेखी निवेदन देण्यात आले असून, निर्णयाचा फेरविचार करण्याची मागणी करण्यात आली आहे.
डॉ. फरहा शेख यांनी सांगितले की, “सार्वजनिक स्थळांबाबत घेतले जाणारे निर्णय सर्वसमावेशक आणि पारदर्शक असणे आवश्यक आहे. कोणत्याही समाजात गैरसमज किंवा भेदभावाची भावना निर्माण होणार नाही, याची प्रशासनाने काळजी घ्यावी.”
दरम्यान, प्रशासनाकडून यासंदर्भात अधिकृत भूमिका स्पष्ट होणे अपेक्षित असल्याचेही फाउंडेशनच्या वतीने नमूद करण्यात आले आहे.

मुख्य संपादक – हरीश शर्मा.
नमस्कार 🙏 मी हरीश शर्मा ( पत्रकार ) गेली 15 वर्षे पुणे शहर व जिल्ह्यातील महत्वाच्या घडामोडींवर ग्राउंड लेवल वर पुण्यातील प्रसिद्ध वर्तमानपत्रात बातमीदारी केली असून यासाठी मला अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तसेच कोरोना काळात ही जीवाची पर्वा न करता प्रामाणिक पत्रकारीता केल्याबद्दल ही ‘कोरोना योद्धा ‘ पुरस्काराने ही विविध संस्था संघटना ने सन्मानित केले . पत्रकार संघ तसेच ‘मुंबई वृत्तवाहिनी वृत्तपत्र पुणे जिल्हा शहर उपाध्यक्ष’ पदी असताना ही उल्लेखनीय कामगिरी केली आहे हे सर्व करत असताना आता थोडस वेगळं काहीतरी करायची इच्छा आहे मित्रांनो यापुढे ही न्युज पोर्टल चॅनेल च्या माध्यमातून माझ्या हातून चांगले कार्य व ताज्या घडामोडींवर प्रखर प्रकाश पडावा व माझ्या हातून निष्पक्ष निर्भीड बातमी यासाठी तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाची अपेक्षा करून चॅनेल चा श्री गणेशा करीत आहे. यासाठी आपले पाठबळ कायम माझ्या पाठीशी राहील ही अपेक्षा करतो. 🙏






















