पुणे पीसीएमसी न्यूज 24:Live
खडकी / प्रतिनिधी : दिनांक ३ ऑक्टोबर
मुंबई-पुणे महामार्गावरील ऑल सेट्स शाळा चौकाला काही वर्षांपूर्वी संविधान चौक असे नामकरण करण्यात आले होते. त्यावेळी चौकात मोठ्या प्रमाणावर फलक उभारून नागरिकांना याची माहिती देण्यात आली होती. परंतु काही काळापूर्वी रस्ता रुंदीकरणाचे काम हाती घेतले गेले. या कामामध्ये चौकातील संविधान चौकाचा फलक काढण्यात आला. मात्र आता रस्ता रुंदीकरणाचे काम पूर्ण झाले असूनही तो फलक अद्याप चौकात बसविण्यात आलेला नाही.
ही बाब नागरिकांच्या लक्षात आल्याने चौकाचे महत्त्व पुन्हा अधोरेखित करण्यासाठी व इतिहास जतन करण्यासाठी दलित पँथर संघटनेच्या वतीने संविधान चौकाचा फलक तातडीने पुन्हा उभारण्यात यावा अशी मागणी होत आहे.
खडकी चा इतिहास व महत्व
खडकी परिसर हा लष्करी दृष्टीने तसेच ऐतिहासिक वारशामुळे विशेष महत्त्वाचा आहे. स्वातंत्र्य संग्रामापासून भारतीय लष्कराच्या स्थापनेपर्यंत खडकीने देशाला अनेक योगदान दिले आहे. पुण्यातील हा परिसर केवळ लष्करी छावणी म्हणूनच नव्हे तर देशभक्तीचे प्रतीक म्हणूनही ओळखला जातो. त्यामुळे खडकीतील संविधान चौकाला ऐतिहासिक व राष्ट्रीय ओळख प्राप्त आहे.
उंच व भव्य तिरंगा ध्वजाची मागणी
फक्त फलक पुनर्स्थापित करण्यावरच नव्हे तर या चौकात देशभक्तीचे प्रतीक म्हणून भारत देशाचा उंच व महाकाय तिरंगा ध्वज उभारण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. तिरंगा ध्वजामुळे चौकाचे महत्त्व वाढेल तसेच नागरिकांमध्ये राष्ट्रप्रेमाची जाणीव सतत ताजी राहील, असा मुद्दा सामाजिक कार्यकर्त्यांनी मांडला.
जनता दरबारात मांडलेली मागणी
ही मागणी छत्रपती शिवाजीनगर मतदारसंघाचे आमदार सिद्धार्थ शिरोळे यांच्या ‘जनता दरबार’मध्ये खडकीतील सामाजिक कार्यकर्ते अभिजित गडांकुश, विशाल ओव्हाळ, सुभाष पाडाळे, राहुल अवचिते यांनी केली. संविधान चौकाची ओळख पुन्हा दृढ व्हावी व राष्ट्रीय ध्वजामुळे चौकात भव्यतेची भर पडावी, यासाठी त्यांनी आमदार शिरोळे यांना निवेदन सादर केले.
आता या मागणीवर शासन व स्थानिक प्रशासन कोणती पावले उचलते याकडे खडकीकरांचे लक्ष लागले आहे.

मुख्य संपादक – हरीश शर्मा.
नमस्कार 🙏 मी हरीश शर्मा ( पत्रकार ) गेली 15 वर्षे पुणे शहर व जिल्ह्यातील महत्वाच्या घडामोडींवर ग्राउंड लेवल वर पुण्यातील प्रसिद्ध वर्तमानपत्रात बातमीदारी केली असून यासाठी मला अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तसेच कोरोना काळात ही जीवाची पर्वा न करता प्रामाणिक पत्रकारीता केल्याबद्दल ही ‘कोरोना योद्धा ‘ पुरस्काराने ही विविध संस्था संघटना ने सन्मानित केले . पत्रकार संघ तसेच ‘मुंबई वृत्तवाहिनी वृत्तपत्र पुणे जिल्हा शहर उपाध्यक्ष’ पदी असताना ही उल्लेखनीय कामगिरी केली आहे हे सर्व करत असताना आता थोडस वेगळं काहीतरी करायची इच्छा आहे मित्रांनो यापुढे ही न्युज पोर्टल चॅनेल च्या माध्यमातून माझ्या हातून चांगले कार्य व ताज्या घडामोडींवर प्रखर प्रकाश पडावा व माझ्या हातून निष्पक्ष निर्भीड बातमी यासाठी तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाची अपेक्षा करून चॅनेल चा श्री गणेशा करीत आहे. यासाठी आपले पाठबळ कायम माझ्या पाठीशी राहील ही अपेक्षा करतो. 🙏






















