पुणे पीसीएमसी न्यूज 24:Live
पुणे / प्रतिनिधी : दिनांक ५ ऑक्टोबर
भारतीय गिग कामगार मंच च्या वतीने ९ ऑक्टोबर २०२५ रोजी राज्यभरातील कॅब, टॅक्सी व रिक्षा चालकांनी प्रवासी सेवा एक दिवसासाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. या बंदचा उद्देश म्हणजे परिवहन विभागातील कथित भ्रष्टाचाराकडे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे लक्ष वेधणे, असा मंच चा इशारा आहे.
१५ जुलैपासून मुंबईतील आझाद मैदानावर या चालकांचे आंदोलन सुरू असून, परिवहन विभागाच्या गैरव्यवहारांविरोधात उपोषण, निदर्शने, बंद अशा विविध मार्गांनी हे आंदोलन सुरू आहे.
मंच चा आरोप आहे की, ओला, उबेर व रॅपिडो या अँप आधारित कंपन्या सरकारी नियमांचे उल्लंघन करून बेकायदेशीर प्रवासी सेवा चालवत आहेत. अनेक एफ.आय.आर दाखल झाल्यानंतरही या कंपन्यांविरुद्ध कोणतीही ठोस कारवाई होत नाही.
३० सप्टेंबर रोजी परिवहन मंत्र्यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेण्यास नकार दिल्याने शेकडो चालकांनी “जेलभरो आंदोलन” करत स्वतःला अटक करून घेतले. त्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या सचिवांनी बैठक घेऊन उपाययोजना करण्याचे निर्देश दिले होते. मात्र, संघटनेच्या म्हणण्यानुसार परिवहन विभागाने त्याकडे दुर्लक्ष केले आहे.
मंच चा आरोप आहे की, परिवहन मंत्री यांनी रॅपिडो कंपनीकडून घेतलेल्या स्पॉन्सरशिपमुळे विभागातील अधिकारी निष्क्रीय झाले आहेत आणि कंपन्यांसमोर झुकत आहेत.
जुलै महिन्यातील आंदोलनादरम्यान 100% चालकांनी बंदमध्ये सहभाग घेतला होता, त्यावेळी विमानतळ प्रशासनाने नागरिकांना स्वतःच्या वाहनांची व्यवस्था करून ठेवण्याचे आवाहन केले होते.
९ ऑक्टोबरला जेव्हा देशभरातील वित्ततज्ञ मुंबईत एका महत्त्वाच्या कॉन्फरन्ससाठी येणार आहेत, त्याच दिवशी हा बंद होणार आहे. त्यामुळे या आंदोलनातून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे लक्ष परिवहन विभागाच्या गलथान कारभाराकडे वळविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
या बंददरम्यान सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवर ताण येण्याची शक्यता असून नागरिकांना मोठ्या प्रमाणात गैरसोय होऊ शकते, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
भारतीय गिग कामगार मंच चे नेते डॉ.केशव नाना क्षीरसागर यांचं असं मत:आहे की
“आमचे मागील तीन महिन्यांपासून सुरू असलेले आंदोलन हे सर्वसामान्य चालकांच्या न्यायासाठी आहे. सरकार आणि परिवहन विभाग जर भ्रष्टाचाराकडे दुर्लक्ष करत राहिले, तर आम्ही आणखी तीव्र आंदोलन करू.”

मुख्य संपादक – हरीश शर्मा.
नमस्कार 🙏 मी हरीश शर्मा ( पत्रकार ) गेली 15 वर्षे पुणे शहर व जिल्ह्यातील महत्वाच्या घडामोडींवर ग्राउंड लेवल वर पुण्यातील प्रसिद्ध वर्तमानपत्रात बातमीदारी केली असून यासाठी मला अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तसेच कोरोना काळात ही जीवाची पर्वा न करता प्रामाणिक पत्रकारीता केल्याबद्दल ही ‘कोरोना योद्धा ‘ पुरस्काराने ही विविध संस्था संघटना ने सन्मानित केले . पत्रकार संघ तसेच ‘मुंबई वृत्तवाहिनी वृत्तपत्र पुणे जिल्हा शहर उपाध्यक्ष’ पदी असताना ही उल्लेखनीय कामगिरी केली आहे हे सर्व करत असताना आता थोडस वेगळं काहीतरी करायची इच्छा आहे मित्रांनो यापुढे ही न्युज पोर्टल चॅनेल च्या माध्यमातून माझ्या हातून चांगले कार्य व ताज्या घडामोडींवर प्रखर प्रकाश पडावा व माझ्या हातून निष्पक्ष निर्भीड बातमी यासाठी तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाची अपेक्षा करून चॅनेल चा श्री गणेशा करीत आहे. यासाठी आपले पाठबळ कायम माझ्या पाठीशी राहील ही अपेक्षा करतो. 🙏






















