पुणे : समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि गरजू कुटुंबांतील बालकांना कर्करोगासारख्या गंभीर आजारावर वेळेवर व दर्जेदार उपचार मिळावेत, या उद्देशाने भवानी पेठ येथील विश्रांती हॉस्पिटलने बालकांच्या कर्करोगासाठी विशेष निःशुल्क उपचार सहाय्य योजना सुरू केली आहे. या योजनेमुळे उपचारांच्या खर्चामुळे अडचणीत सापडलेल्या अनेक कुटुंबांना मोठा आधार मिळणार आहे.
या योजनेअंतर्गत पात्र बालरुग्णांना अनुभवी कर्करोगतज्ज्ञ व बालरोगतज्ज्ञांचा निःशुल्क सल्ला, आवश्यक औषधे, केमोथेरपी तसेच रेडिएशन थेरपी पूर्णपणे विनामूल्य उपलब्ध करून दिली जाणार आहे. उपचारादरम्यान आवश्यक वैद्यकीय मार्गदर्शन व समुपदेशनाची सुविधाही देण्यात येणार असून, रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबियांना प्रत्येक टप्प्यावर सहकार्य केले जाणार आहे.
भारतामध्ये दरवर्षी हजारो बालकांना विविध प्रकारच्या कर्करोगाचे निदान होते. योग्य वेळी निदान आणि तज्ज्ञ उपचार मिळाल्यास अनेक मुलांना पूर्णपणे बरे होण्याची संधी असते. मात्र उपचारांचा मोठा खर्च अनेक कुटुंबांसाठी अडथळा ठरतो. ही बाब लक्षात घेऊन विश्रांती हॉस्पिटलने हा लोकहिताचा उपक्रम सुरू केला आहे.
विश्रांती हॉस्पिटलने यापूर्वीही महिलांसाठी स्तनाचा कर्करोग, अंडाशयाचा कर्करोग आणि गर्भाशयमुखाच्या कर्करोगावरील निःशुल्क उपचार योजना राबवून अनेक रुग्णांना दिलासा दिला आहे. आता या सेवांचा विस्तार करत बालकांच्या कर्करोग उपचारांचाही समावेश करण्यात आला आहे.
संस्थापक विश्वस्त कर्नल एन. एस. न्यायपती यांनी राज्यातील बालरोगतज्ज्ञ, कर्करोगतज्ज्ञ, कौटुंबिक डॉक्टर, शासकीय व खासगी रुग्णालये, स्वयंसेवी संस्था आणि सामाजिक कार्यकर्त्यांना आवाहन केले आहे की, आर्थिकदृष्ट्या दुर्बल बालकर्करोग रुग्णांची माहिती या योजनेपर्यंत पोहोचवून गरजू कुटुंबांना उपचारांचा लाभ मिळवून द्यावा.
तसेच, कर्करोगग्रस्त बालकांच्या पालकांनी आणि नागरिकांनीही या योजनेची माहिती अधिकाधिक गरजू कुटुंबांपर्यंत पोहोचवून जनजागृतीसाठी सहकार्य करावे, असे आवाहन हॉस्पिटल प्रशासनाने केले आहे.
संपर्क :
विश्रांती हॉस्पिटल, भवानी पेठ, पुणे
📞 77700 08249 / 73500 10595

मुख्य संपादक – हरीश शर्मा.
नमस्कार 🙏 मी हरीश शर्मा ( पत्रकार ) गेली 15 वर्षे पुणे शहर व जिल्ह्यातील महत्वाच्या घडामोडींवर ग्राउंड लेवल वर पुण्यातील प्रसिद्ध वर्तमानपत्रात बातमीदारी केली असून यासाठी मला अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तसेच कोरोना काळात ही जीवाची पर्वा न करता प्रामाणिक पत्रकारीता केल्याबद्दल ही ‘कोरोना योद्धा ‘ पुरस्काराने ही विविध संस्था संघटना ने सन्मानित केले . पत्रकार संघ तसेच ‘मुंबई वृत्तवाहिनी वृत्तपत्र पुणे जिल्हा शहर उपाध्यक्ष’ पदी असताना ही उल्लेखनीय कामगिरी केली आहे हे सर्व करत असताना आता थोडस वेगळं काहीतरी करायची इच्छा आहे मित्रांनो यापुढे ही न्युज पोर्टल चॅनेल च्या माध्यमातून माझ्या हातून चांगले कार्य व ताज्या घडामोडींवर प्रखर प्रकाश पडावा व माझ्या हातून निष्पक्ष निर्भीड बातमी यासाठी तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाची अपेक्षा करून चॅनेल चा श्री गणेशा करीत आहे. यासाठी आपले पाठबळ कायम माझ्या पाठीशी राहील ही अपेक्षा करतो. 🙏

















