पुणे पीसीएमसी न्यूज 24: पुणे :
पुणे: अलीकडच्या काळात पुणे शहरात महिलांच्या बेपत्ता होण्याच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाल्याचं समोर आलं आहे. विद्येचं माहेरघर म्हणून ओळखलं जाणारे पुणे आता गुन्ह्यांच्या शहराकडे वाटचाल करत असल्याची भीती निर्माण झाली आहे.
अत्यंत धक्कादायक घटना म्हणजे नुकतीच घडलेली एक घटना वाघोली परिसरातील 24 वर्षीय पूजा खंबाट ही महिला, अवघ्या 9 दिवसांच्या बाळाला सोडून घरातून बेपत्ता झाली. सीसीटीव्ही फुटेजमध्ये ती घर सोडून जाताना दिसली आहे, परंतु तिचा ठावठिकाणा अद्याप लागलेला नाही. धक्कादायक बाब म्हणजे तिची नुकतीच सिझेरियन डिलिव्हरी झाली असून टाके देखील पूर्णपणे भरलेले नाहीत.
ही केवळ एक घटना नाही. मिळालेल्या आकडेवारीनुसार, 2022 मध्ये पुणे जिल्ह्यातून तब्बल 840 महिला गायब झाल्या होत्या. 2024 मध्ये अल्पवयीन मुली, तरुण आणि तरुणी बेपत्ता होण्याच्या घटनांनी खळबळ उडाली आहे. महिलांच्या बेपत्ता होण्यामागची कारणं पोलीस आणि समाजशास्त्रज्ञांच्या मते, बेपत्ता होणाऱ्या महिला व मुलींचा वयोगट साधारणतः 16 ते 25 वर्षे आहे.
• घरातील सतत होणारी भांडणं
• रुढी-परंपरांचा दबाव
• नोकरी करण्याची इच्छा
• स्वतःची ओळख निर्माण करण्याची धडपड
यामुळे अनेक मुली घर सोडण्याचा निर्णय घेतात. तर काही प्रकरणांत अपहरण आणि मानवी तस्करीसुद्धा झाल्याचे उघड झाले आहे
बोपोडी येथील डॉ. फरहा अन्वर हुसैन शेख, अध्यक्षा – मिस फरहा चॅरिटेबल फाऊंडेशन, यांनी या गंभीर परिस्थितीवर तीव्र चिंता व्यक्त केली आहे. त्यांचे म्हणणे आहे की, “महिलांची सुरक्षितता ही केवळ कायद्याचा विषय नाही तर समाजाच्या मानसिकतेचाही मुद्दा आहे. घर, समाज आणि सार्वजनिक ठिकाणी महिलांना सुरक्षित वातावरण मिळालं पाहिजे. पोलिसांनी या प्रकरणांवर अधिक तत्परतेने काम करणे आवश्यक आहे. आम्ही या मुद्द्यावर जनजागृती आणि कायदेशीर मदत करण्यासाठी पुढाकार घेऊ.”
समाज आणि प्रशासनाला आवाहन
• प्रत्येक कुटुंबाने आपल्या मुलींना विश्वास, समजूत आणि आधार द्यावा
• पोलीस यंत्रणेने तक्रारींवर त्वरित कारवाई करावी
• सामाजिक संस्थांनी महिला सक्षमीकरण आणि सुरक्षिततेसाठी पुढाकार घ्यावा
महिलांच्या बेपत्ता होण्याचे प्रमाण कमी करण्यासाठी शासन, पोलीस, सामाजिक संस्था आणि कुटुंबीय यांची एकत्रित जबाबदारी आहे असे ही डॉ. फरहा यांनी म्हटले आहे.

मुख्य संपादक – हरीश शर्मा.
नमस्कार 🙏 मी हरीश शर्मा ( पत्रकार ) गेली 15 वर्षे पुणे शहर व जिल्ह्यातील महत्वाच्या घडामोडींवर ग्राउंड लेवल वर पुण्यातील प्रसिद्ध वर्तमानपत्रात बातमीदारी केली असून यासाठी मला अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तसेच कोरोना काळात ही जीवाची पर्वा न करता प्रामाणिक पत्रकारीता केल्याबद्दल ही ‘कोरोना योद्धा ‘ पुरस्काराने ही विविध संस्था संघटना ने सन्मानित केले . पत्रकार संघ तसेच ‘मुंबई वृत्तवाहिनी वृत्तपत्र पुणे जिल्हा शहर उपाध्यक्ष’ पदी असताना ही उल्लेखनीय कामगिरी केली आहे हे सर्व करत असताना आता थोडस वेगळं काहीतरी करायची इच्छा आहे मित्रांनो यापुढे ही न्युज पोर्टल चॅनेल च्या माध्यमातून माझ्या हातून चांगले कार्य व ताज्या घडामोडींवर प्रखर प्रकाश पडावा व माझ्या हातून निष्पक्ष निर्भीड बातमी यासाठी तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाची अपेक्षा करून चॅनेल चा श्री गणेशा करीत आहे. यासाठी आपले पाठबळ कायम माझ्या पाठीशी राहील ही अपेक्षा करतो. 🙏

















